Site icon InMarathi

या टिप्स वापरल्यात तर आयुष्यात दररोज नव्याने भेडसावणाऱ्या समस्यांतून सहज मार्ग काढता येईल

priyanka chopra inmarathi

sportskeeda

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयुष्य म्हणजे समस्या ह्या ओघाने आल्याच.

प्रत्येकाच्याच आयुष्यात समस्या असतात. त्या कायम आहेत आणि आपण टाळू शकत नाही.

मात्र या समस्यांमुळे खचून न जाता त्यातून मार्ग काढणं गरजेचं असतं.

 

 

अनेकदा समोरील प्रश्न तितकासा गंभीर नसतो, मात्र मार्ग दिसत नसल्याने आपण हार मानतो.

ह्या समस्यांना तोंड द्यायला शिकायचं, त्यातून मार्ग काढायचा. पण तो कसा? तेच आपण आज बघुया!

१) आपल्याला आपले ध्येय गाठता आले नाही….

प्रत्येकाने आपापले ध्येय ठरविले असते..आपले शिक्षण, करिअर, उद्योग, व्यवसाय अशी नाना लोकांची विविध लक्ष्य असतात. पण प्रत्येकाला ती गाठता येतातच असे नाही.

 

 

कित्येक मोठ्या लोकांची चरित्रे वाचताना हे लक्षात येते की त्यांनाही आपले लक्ष्य गाठता येत नाही. त्यासाठी काय उपाय करता येईल ते पाहूया.

आपण साध्य न केलेलं ध्येय घ्या आणि वेगळा दृष्टिकोन वापरून पहा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी वारंवार आणि त्याच गोष्टी करणे म्हणजे यशाची व्याख्या आहे.

आपले नायक त्यांचे ध्येय देखील गमावतात. पण, ते हार मानत नाहीत. लक्ष्य ठरवताना ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपण अयशस्वी व्हाल हे जाणून घेणे.

२) आपल्यावर होणारी टीका

अपणा जेव्हा एखादी गोष्ट करण्यास सुरुवात करायची असेल तर सगळ्यात आधी आपल्यावर टीका होणार हे लक्षात घेतले पाहिजे.

 

campus reform

 

आपली आकांक्षा जितकी मोठी असेल तितकी जास्त आपल्यावर टीका होईल. आपल्याकडे समीक्षकांची संख्या आपल्या यशाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.

आयुष्यात आपल्याला भेटलेल्या प्रत्येकाला आपण संतुष्ट करू शकत नाही. टिका वाईट नाहीत. आपण त्यांच्याकडून आपल्याबद्दल गोष्टी देखील शिकू शकतो. उपाय म्हणजे टीकेमुळे न घाबरता, न खचता त्यातून शिकून पुढे जायला हवं.

अमिताभ बच्चन हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे, त्यांच्या पहिल्याच चित्रपटानंतर त्यांच्या उंचीवरून, आवाजावरून त्यांच्यावर टीका झाली. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

 

LAWNN

 

फ्लॉप हीरो ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार असे सुरु असतानाच त्यांच्या ABCL कंपनीला खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले.

चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठली पण त्यातूनही सावरून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ‘कौन बनेगा करोडपती’ मधून त्यांनी पुन्हा यशस्वी भरारी घेतली.

३) तुमची कारकीर्द गोंधळली

आपण उद्योजक असलात किंवा कार्यालयीन कर्मचारी, आपल्या कामकाजात, कारकीर्दीत कधीतरी गडबड होईल. व्यवसायाची व्याख्या अशी आहे. एका समस्येपासून दुसर्‍या समस्येकडे जाणे आणि त्या दरम्यान आपल्या पैसे कमविणे.

आपण स्थापित केलेला व्यवसाय मागे पडू शकतो आणि दिवाळखोरी देखील होऊ शकतो. आपले करियर कौशल्य कालबाह्य होऊ शकते.
आपण चूक केल्यामुळे काढून टाकले जाऊ शकते.

जर तुमच्या करिअर मध्ये कधीच अडथळा आला नाही तर तुम्ही वेगळं करून बघ्ण्याच प्रयत्न केला नाही किंवा नेहमीच कंफर्ट झोनमधे राहणे पसंत केले.

 

 

वेगळे प्रयोग केले तर सुरूवातीला अडथळे येतील पण त्यावर मात करून पुढे जाणे आणि यश मिळविणे!

४) आपणास आर्थिक त्रास आहे

पैशांची चणचण ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मनुष्याला पैसा महत्त्वाचा वाटणे ही चुकीची गोष्ट नाहीये परंतु, पैसा हेच जीवनाचे ध्येय नाहिये हे लक्षात घ्यायला हवे.

पैशाचा अभाव ही एकसंधी आहे, स्वतःला सिद्ध करण्याची. जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात, आपण एकाच वेळी संसाधित आणि सर्जनशील बनता.

 

budget.com

 

पैशाचा अभाव आपल्याला काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे ठरविण्यात मदत करते. आपण कदाचित आपल्या कुटुंबास, अन्नधान्य विकत घेण्यास प्राधान्य द्याल. जीवनातल्या साध्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद शोधण्याची सवय होईल.

पैसा हेच जीवन नसून पैसा हे जीवनातील एक आनंदाचे साधन आहे हे लक्षात घेता येईल.

५) आपण अस्वस्थ आहात

या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, आरोग्याकडे लक्ष देणे प्रत्येक वेळी जमणे कठिण आहे. आपले आरोग्य ही एक वास्तविक समस्या बनली आहे. आपल्या आयुष्याच्या काही क्षणी आम्ही सर्व आरोग्याची आव्हाने अनुभवु.

तरुण वयात आपण किती आरोग्य आव्हाने अनुभवतो ते अन्न आणि व्यायामासाठीकिती वेळ दिला ह्यावर अवलंबून असते. निरोगी राहण्याची धोरणे बदलली नाहीत. पण माणसाची सुखाची व्याख्या बदलली.

आळशीपणा वाढला. कामाच्या नादात शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. झोपेच्या वेळा बदलल्या. माणूस सुखासीन होऊ लागला त्यामुळे शारिरिक अस्वास्थ्य वाढले.

 

soposted.com

 

व्यायामाला वेळ द्या. आजारी वाटणे सोडून द्या आणि त्याबद्दल काहीतरी करा. वेळच्या वेळी योग्य तो आहार घेण्याची सवय ठेवा. योग्य प्रमाणात झोप घ्या.

जास्त पाणी प्या. अधुनमधून आपल्या डेस्कवरुन उभे राहा आणि मणक्यांचे /मानेचे छोटेसे व्यायाम करा.

६) नाती तुटणे

बहुतेक वेळा अनेक कारणांनी अनेक नाती तुटतात. काही नाती दुरावल्याचा आपल्या कामावर काहीही परिणाम होत नाही पण काही नाती अशी असतात, की जी तुटल्यावर आपण खचून जातो.

आपले लक्ष कशातच नसते. नाते तुटल्याची जखम खूप खोल असते ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो.

 

twiniversity.com

 

आपण फसवले गेलोय किंवा आपल्याला कुणीतरी नाकारलंय, दुखावलंय ही कल्पना असहनीय असते. पणह्यावर् उपाय करायलाच हवा ना?

आधी आपल्या मनाला समजवायला हवे की कोणा एका व्यक्तीच्या नसण्याने आयुष्य तर थांबता नाही. ज्यांना आपण हवे आहोत अशा व्यक्ती जास्त आहेत हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या आवडत्या छंदामधे मन रमवावे.

आपण ज्या व्यक्तींना आवडतो त्यांच्याबरोबर वेळ घालवावा. ती माणसे नक्कीच आपल्याला निराशेतून बाहेर पडण्यास मदत करतील.

७) ताणतणाव

सर्वच लोकांना तणावाला सामोरे जावे लागते. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला चिंता भेडसावते.

यशस्वी होऊ की नाही, आपण करतोय ते योग्य की अयोग्य, पैसा पुरेल ना, कौटुम्बिक समस्या अशा एक ना अनेक ताण आपल्या मनावर असतात.

 

 

तणावामुळे मानसिक थकवा, मेंदूवर परिणाम, मानसिक स्पष्टतेचा अभाव अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.

अधिक हवे असा हव्यास सोडा, आपला मित्रपरिवार नर्यादित ठेवा जो आपल्याला निराशेतून, ताणतणावातून बाहेर काढेल. आवश्यक त्या वस्तूंचीच खरेदी करा. आपल्या गरजा मर्यादितच ठेवा.

 

cart91

 

अशी पुस्तके वाचा जी तुम्हाला उमेद देतील, प्रेरणादायी चरित्र वगैरे वाचण्यावरा भर द्या.

८) एकसुरीपणा

सकाळी उठा, कामावर जा, काम करा, संध्याकाळी थकून भागून घरी या जेवा आणि झोपा. सुट्टीच्या दिवशी आराम करा. हा दिनक्रम महिनोन् महिने चालत राहतो आणि खरोखरच १ दिवस ह्याचा आपल्याला कंटाळा येतो.

कामात लक्ष लागत नाही. ‘I need a break’ ही भावना वाढीस लागते. त्यातून चिडचिडेपणा, कामात चूका होणे अशा गोष्टी घडतात.

 

 

imdb.com

 

कामातला एकसुरीपणा टाळा. आपल्याला आपल्या कामातून आनंद घेणे आवश्यक असते. एखाद्या वेळी कुठेतरी फिरून या. आवडत्या छंदाला वेळ द्या.

९) भिती

प्रत्येकाला कशा ना कशाची तरी भीती कायम सतवत असते. कोणाला अपयशाची, कोणाला स्पर्धेची, कोणाला गर्दीची तर कोणाला नाकारले जाण्याची!

 

cpo magzine

 

भीती सगळ्यांनाच वाटते फक्त तिचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यामुळे कामात दिरंगाई होणे, कामात लक्ष नसणे, कोणाच्या बोल्ण्याकडे लक्ष नसणे ह्यासारख्या चूका होतात.

भीतीवर मात करणे हा खूप चांगला उपाय आहे. एका प्रसिद्ध शीतपेयाच्या कंपनीची जाहिरात आहे “डर के आगे जीत है”.

एखाद्या गोष्टीला घाबरून तिच्यापासून दूर जाण्याने यश मिळेल का? अर्थातच “नाही”!

म्हणजेच भाय ही गोष्ट सहज मात करण्यासारखी आहे. सतत एखद्या भीती वाटणर्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर त्या गोष्टीची भीती वाटेनाशी होते.

१०) त्रास देणारी मित्रमंडळी

आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्यांना आपली प्रगती बघवत नाही. त्यातले बरेचसे आपल्याला मित्र म्हणवून घेणारे असतात. असे लोक अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

आपल्या प्रगतीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करतात. अशांना वेळीच ओळखा.

 

अर्थात अशांना आयुष्यातून वजा करणे! त्यांना त्यांचा हेतू तुम्हाला समजला आहे हे जाणवून द्या. सुधारले तर ठिक नाहीतर त्यांना दूर करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version