Site icon InMarathi

होळी आणि धूळवड का साजरी केली जाते? ही आहेत शास्त्रीय कारणं

ranbir inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनुष्य हा उत्सवप्रिय आहे! आपल्या जुन्या ग्रंथातून, कथा-नाटकांतून आपल्याला अनेक उत्सवांचा उल्लेख आढळतो. कालिदास, भास, बाणभट्ट ह्यांच्यासारख्या कवी-महाकवींनी आपल्या साहित्यात सणांचे वर्णन केलेले आढळते.

आपण एकटे राहू शकत नाही. आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र ह्यांच्यासमवेत आपण सतत असतो. आपल्याला एकत्र येण्यासाठी काहीतरी कारण हवेच असते, नाही का?

मग त्यासाठी ही सण-उत्सव ह्यांची परंपरा सुरु झाली असावी. ह्या सणांमुळे आनंद, ऊर्जा मिळते. उत्साह वाढतो. तसेच आप्त-स्वकीय भेटल्यामुळे एक वेगळेच चैतन्य निर्माण होते.

 

 

आपल्याकडचे सगळे सण हे शास्त्रीय कारणे असणारे आहेत. गुढीपाडवा हा सण चैत्रात जे पीक येते ते वापरून, जे हवामान असते त्यासाठी अगदी योग्य ते करून साजरा केला जातो.

दीपावली थंडीमुळे येणाऱ्या त्वचेच्या समस्यांना तोंड देता यावे याकरीता फराळ घेऊन येते. तसेच त्या दिवसात असणारी अमावास्या सगळ्यात जास्त काळोखी असते, त्यासाठी दिव्यांची आरास केली जाते.

 

हे ही वाचा – नवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….!

अशा प्रकारे सगळेच सण शास्त्रीय, वैज्ञानिक आणि निसर्गाच्या कालचक्राप्रमाणे असणारे आहेत.

अर्थातच होळी हा सण देखील ह्याला अपवाद कसा ठरेल? होळी इंग्रजी महिन्याप्रमाणे साधारण मार्च मध्ये येते. मराठी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिकोत्सव असतो, फाल्गुन महिन्यात वसंत ऋतुला सुरुवात होते. म्हणून होळीला वसंतोत्सव असेही म्हटले जाते.

होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते.

यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

होलिका दहनाचे पौराणिक व सांस्कृतिक महत्त्व आपल्याला माहिती आहे. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

 

 

वसंत ऋतू मध्ये होळी खेळली जाते जी हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या आगमनाच्या कालावधी दरम्यान असते. हा कालावधी वातावरणात तसेच शरीरात बॅक्टेरियांच्या वाढीस प्रेरित करते.

वसंत ऋतुमध्ये हवामान बदलते आणि आपल्या शरीरावर गोवर, देवी, विषाणूजन्य ताप आणि सर्दी या आजारांचा धोका असतो. होलिका जळाल्यावर जवळपासच्या भागाचे तापमान सुमारे ५०-६० डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते.

जेव्हा लोक होलिका दहन होताना होळीला प्रदक्षिणा घालतात तेव्हा उष्णतेमुळे शरीरातील जीवाणू नष्ट होतात आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

देशाच्या काही भागात होलिका दहनानंतर लोकं कपाळावर त्याची राख लावतात आणि चंदन, आंब्याच्या झाडाची पाने व फुले मिसळून ते खातात. असे म्हणतात की, ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते.

 

 

वसंत हा असा ऋतु आहे ज्याच्यामुळे लोकांमध्य अस्वस्थतेची भावना येते. वातावरणात थंडी व उष्णतेमुळे हवामानात बदल झाल्यामुळे शरीराला अशक्तपणा जाणवणे फारच स्वाभाविक आहे.

या अशक्तपणाचा, सुस्तपणाचा प्रतिकार करण्यासाठी लोक ढोल, मंजिरा आणि इतर पारंपारिक वाद्यांसह गाणी गातात. हे मानवी शरीराला नवजीवन देण्यास मदत करते.

रंगांसह खेळताना त्यांची शारीरिक हालचाल देखील प्रक्रियेस मदत करते. होळी सणाच्या निमित्ताने लोकगीते, पारंपरिक गाणी म्हणण्याची परंपरा आहे. मोठमोठ्याने गाणी म्हटल्यामुळे शरीराला त्याचा उपयोग होतो.

शरीरात ऊर्जा निर्माण होते. थकवा, निराशा दूर होऊन सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण होते, असेही सांगितले जाते. त्याचप्रमाणे सगळ्यांसोबत गाणी गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी आनंदी होऊन जाते.

 

 

रंग मानवी शरीराच्या तंदुरुस्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. एखाद्या विशिष्ट रंगाच्या कमतरतेमुळे आजार उद्भवू शकतो आणि जेव्हा त्या रंगाचा घटक आहार किंवा औषधाद्वारे घेतला जातो तेव्हा बरे होतो.

हे जाणूनच प्राचीन काळी, लोकांनी होळी खेळायला सुरवात केली तेव्हा त्याद्वारे वापरलेले रंग हळद, कडुनिंब, पलाश (पळस, अग्निशीखा), तसेच ह्या काळात मिळणारी निरनिराळी फुले-फळे इत्यादी नैसर्गिक स्त्रोतांपासून बनविलेले असतात.

या नैसर्गिक स्त्रोतांनी बनविलेले रंग टाकणे व फेकणे यावर शारीरिक व्याधी बरे करणारा प्रभाव पाडते. याचा प्रभाव शरीरातील लोह बळकट होण्यावर होतो.

 

 

होलिकादहनानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्याची पद्धत आहे. यामध्ये अनेकविध रंगांचा आपण वापर करतो. अबीर आणि गुलाल यांचा वापर हा त्वचेसाठी चांगला असतो, या गोष्टीला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे.

रंगीत पाणी, रंग खेळताना गुलालाचा वापर केल्याने त्वचेला उत्तेजन मिळते. थंडीमुळे कोरडी पडलेली त्वचा गुलाल आणि अबीरमुळे टवटवीत होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 

 

तसेच धुळवडीला आपण विविध खेळ खेळतो. शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणावर करतो. त्यामुळे चलनवलन होऊन शरीरातील सुस्तपणा नाहीसा होतो. यातून आपल्याला सकारात्मकता मिळते.

याचा उपयोग मानसिक शांतता आणि मानसिक ताजेपणा येण्यासाठी होतो, असेही सांगितले जाते. शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी रंगांचा वापर महत्त्वाचा असल्याचे अनेक डॉक्टर, फिजिशियन यांचे म्हणणे आहे.

 

हे ही वाचा – दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…

त्याचप्रमाणे हवेतला गारठा जाऊन अचानक उष्णता वाढायला लागते. ह्या ऊष्णतेचा प्रतिकार करणे किंवा एकदम त्या ऊष्णतेला सहन करण्यास आपले शरीर सक्षम नसते किंवा शरीराचा समतोल राखणे कठिण जाते.

अशा वेळी पाणी आपल्याला शरीराला अत्यंत उपयुक्त ठरते. रंगमिश्रित पाणी ह्या काळात आपल्या शरीराला आरोग्याला खूपच उपयुक्त असते.
पण आजकाल बाजारात आपल्या आरोग्याला मारक असे केमिकलयुक्त रंग येतात.

त्वचेला त्रास होऊ नये यासाठी तेल लावणे योग्य.

 

 

ह्या रंगांचा शरीरावर खूपच घातक परिणाम होतो. ऍलर्जी, पुरळ, चट्टे उठणे ह्यांसर्ख्या समस्या उद्भवतात. तसेच डोळ्यांसाठीही हे रंग खूपच हानीकारक ठरतात.

रंगांचे नैसर्गिक स्त्रोत वापरणे केव्हाही योग्यच ठरते ते शरीराला उपयोगी असणार्या घटकामुळेंच! चला तर मग ते स्रोत जाणून घेऊया :

हिरवा रंग –

मेहंदी आणि गुलमोहराच्या झाडाची वाळलेली पाने, सुबाभळीची पाने व औषधी वनस्पती, पालकाची पाने, कण्हेरीची पाने आणि सूचीपर्णाची पाने इत्यादी.

 

 

पिवळा रंग –

हळद (हळद) पावडर, बेलाचे फळ, आवळा, शेवंतीच्या प्रजाती आणि झेंडू, पिवळी फुले, सूर्यफूल, झेंडू, वाळलेली पाने आणि डहाळ्या, हरभरा पीठ इत्यादी.

लाल रंग –

 

 

गुलाब किंवा लाल सफरचंदच्या झाडाची साल, लाल चंदन (रक्तचंदन) ची पावडर, लाल डाळिंबाची साल आणि बिया, पळसाच्या झाडाची फुले (पलाश), सुवासिक लाल चंदनाची लाकूड, वाळलेल्या जास्वंदीची फुले, मंजिष्ठा, लाल मुळा आणि डाळिंब इत्यादी.

केशरी रंग –

 

 

पळसाच्या झाडाची केशरी फुले (पलाश,) हळद पावडरमध्ये चुना मिसळल्याने केशरी रंग तयार होतो. संत्र्याची पूड, पिवळी फुले असलेले एक काटेरी झाड (कोरांटी), केशर इत्यादी.

निळा रंग –

निळी जास्वंद, ब्लू बेरीज् इत्यादी

तपकिरी रंग –

वाळलेल्या चहाची पाने, लाल मॅपल झाडे, काथ इत्यादी.

काळा रंग –

द्राक्षांच्या काही प्रजाती, आवळ्याची पूड लोखंडी भांड्यात रात्रभर भिजवून ठेवणे इत्यादी.

जांभळा –

जांभूळ, बीटरूट इत्यादी.

 

 

चला तर मग! आपला हा वसंत ऋतु आरोग्यदायी आणि आनंददायी बनवुया! होलिका दहन, नैसर्गिक रंग, पाणी आणि संगीत-नृत्य ह्यांचा आरोग्यदायी हा सण साजरा करूया!

===

हे ही वाचा – एका शापामुळे सुरू झाली तुळशीविवाहाची प्रथा! वाचा, यामागची पौराणिक कथा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version