Site icon InMarathi

पवार साहेबांची खास ‘चाणक्य-नीती’ दर्शवणारी १० वक्तव्यं…!

sharad pawar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – प्रतिक कोसके
===

महाराष्ट्रातील सर्वात सिद्धहस्त राजकारणी म्हणून शरद पवार यांना आपण सगळेच ओळखतो. आजवर अनेक विरोध पक्षातल्या राजकारण्यांनी, राजकीय विश्लेषकांनी, समर्थकांनी त्यांचे वर्णन “तेल लावलेला पैलवान” असे केले आहे.

 

 

पवार साहेबांच्या डोक्यात काय योजना असतात हे साक्षात ब्रह्मदेवालाही ठाऊक नसते असं गमतीने म्हणतात. तेही खरेच आहे म्हणा!

शरद पवारांच्या राजकीय खेळी, त्यांची मुत्सद्देगिरी तीन चार दशके महाराष्ट्र पाहत आला आहे. एखाद्या विषयावर त्यांची भूमिका किती ‘पोलिटिकली’ करेक्ट असते हेही आपल्याला माहित आहे.

मुरब्बी आणि कसलेल्या राजकारणी होण्यासाठी आवश्यक असणारे सगे गुण पवार साहेबांच्या अंगी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पवार साहेबांच्या याच भूमिका वेळोवेळी कशा बदलत गेल्या हे दाखवणारे काही बातम्यांचे फोटोज आम्ही वाचकाबरोबर शेअर करत आहोत, जे पहिले की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही.

१. ब्राह्मण, मुस्लिम, जैनांनाही आरक्षण?

 

बेरजेचे राजकारण कसे करावे हे शरद पवार सोडून दुसरं कुणी जाणतं का?

तुम्हीच पहा ना, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याच सामाजाला दुखवायचं नाही म्हणून सर्वोपकारी धोरण अवलंबत सगळ्याच समाजांना आरक्षण द्या असं म्हणताय पवार साहेब!

म्हणजे फक्त मराठ्यांनाच नाही तर ब्राह्मणः ५.५ टक्के, जैन, मुस्लिमः १०.५ टक्के इतके आरक्षण. असं झाल्यास महाराष्ट्रात एकूण ८० टक्के होणार आहे.

पण थांबा – हे पहा –

२. जातीवर आरक्षण नको

 

 

थांबा थांबा, गोंधळात पडू नका! हेही वक्तव्य पवार साहेबांचंच आहे. तेही राज ठाकरे यांनी पुण्यात मोकळ्या मैदानावर त्यांची सुपरहिट मुलाखत घेतलेली तेव्हाचं आहे.

काय? दोन वेगवेगळ्या भूमिका कशा म्हणताय?

सांगितलं ना,

“पवार साहेबांच्या मनात जे चालू असतं ते खुद्द ब्रह्मदेवही जाणू शकत नाही.

३. देशाला आता रामायण महाभारताची गरज नाही!

 

 

सरसंघचालक मोहन भागवतांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पवार साहेब काय म्हणतात पहा.. “रामायण महाभारताची देशाला काहीही गरज नाही!” तरी बरं, राष्ट्रवादीचे अपत्य असलेली संभाजी ब्रिगेड रामायण महाभारताचे संदर्भ घेऊनच द्वेषाची पेरणी करत असतात!

“ए कोण आहे रे तिकडे? कोण म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊनी रामायण महाभारतातल्याच गोष्टी सांगितल्या म्हणून? असं काही बोलायचं नाही. शांत बसा बरं!! शांत अगदी!!”

४. शरद पवार करणार ईद-ए-मिलादच्या मिरवणूकीचे नेतृत्व

 

खरंय बरं का हे!

रामायण महाभारतासारखे भारतीय धर्मग्रंथ आता निरुपयोगी झाले आहेत, पण चौदाशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम धर्माची आणि त्याच्या धर्मग्रंथात सांगितलेल्या सर्व प्रथांचा मान राखला गेलाच पाहिजे!

५. तिहेरी तलाक हा कुराणाचा आदेश

 

 

एकदा ईद ए मिलाद च्या मिरवणुकीचे नेतृत्व स्वीकारले ना, मग धड घेतले तर शेपूट कशाला सोडायचे?! म्हणून तिहेरी तलाकलाही मान्यता देऊन टाका.

“काय म्हणालात, शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी परंपरा वगैरे? काहीही बोलू नका हो!”

६. अजून पाच वर्षे देशात मोदी सरकारच असावे

 

 

“पवार साहेब माझे राजकीय गुरु आहेत” असे मोदींनी म्हटले, आणि आपल्या शिष्याच्या प्रेमाला जगात पवार साहेबांनीही देशात पाच वर्ष तरी मोदींचेच सरकार असावे अशी इच्छाही जाहीर करून टाकली होती!

आहे की नाही असामान्य शिष्यप्रेम?

===

हे ही वाचाबाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर नं आलेले महत्वपूर्ण पैलू

===

७. एकत्र या, भाजप नावाची आपत्ती घालवली पाहिजे!

 

 

“ओह वेट! वरची बातमी काहीतरी वेगळीच होती का? असेल बुवा. आपल्याला काय?!”

“पण वरती तर मोदी सरकार अजून पाच वर्ष तरी टिकायला हवं म्हणतायेत ना साहेब?”

“याचं उत्तर दिलंय ना वरतीच! पवार साहेबांच्या मनात काय चाललंय हे खुद्द ब्रह्मदेवही जाणू शकलेला नाही.”

८. ‘भीमा कोरेगाव’ दंगलीमागे पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना; पवारांचा हल्लाबोल!

 

भीमा कोरेगावचा हिंसाचार ही सरत्या वर्षातली महाराष्ट्राने अनुभवलेली सर्वात गंभीर आणि दुर्दैवी घटना. पवार साहेब या बातीत प्रतिक्रिया देताना काय म्हणाले होते पहा,

“भीमा-कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे झाल्यानिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही हिदुंत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन-चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत.”

 

 

आपल्या भूमिकेबाबत पवार साहेब इथे पुरेसे स्पष्ट दिसत आहेत. भीमा कोरेगाव दंगलीत हिंदुत्ववादी संघटनांचा हात होता असे त्यांचे मत होते. हरकत नाही.

पण – हे काय –

९. भीमा-कोरेगाव हिंसाचाराला कोणतीही संघटना जबाबदार नाही; पवारांचे घुमजाव

 

 

आता ही भूमिका घेताना नक्की काय विचार केला असेल बर साहेबांनी? आणि असंही नाही की हे कुठल्याश्या वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेलं मत होतं.

महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव संदर्भात जी अधिकृत समिती स्थापन केली त्या समितीसमोर बोलताना शरद पवार हे म्हटले आहेत.

यावरून वाचकांनी काय तो निष्कर्ष काढावा!

शेवटी या आधुनिक चाणक्याच्या राजकारणावर कमेंट करणारे आपण कोण पामर, नाही का?!

१०. राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट!

 

 

लवासा, सिंचन घोटाळा.. वगैरे वगैरे. असं हसायचं नाही ह गालातल्या गालात. तुम्हाला ना, पवार साहेबांच्या संघर्षाची जाणच नाही बघा!

ही झाली पवार साहेबांच्या असामान्य चाणक्यनीतीची काही उदाहरणे.

खरंतर ही एवढीच नाहीत. पवार साहेबांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीची अशी अगणित उदाहरणे देता येतील. सुज्ञ वाचकांच्या ती ध्यानातही असतील.

पण साहेबांंच्या चाणक्यनीतीला मर्यादा नसल्या तरी आमच्या लेखणीला आहेत!

म्हणून थांबतो!

(आमचे मित्र पियुष कश्यप, ह्यांनी हे सर्व फोटो फेबुकवर शेअर केले, आणि आम्हाला हा लेख लिहिण्यास प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे आभार!)

===

हे ही वाचा –  ..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय?’ हे दाखवून दिले

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version