Site icon InMarathi

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे “रियल लाईफ हिरो” आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दिवसेंदिवस दुषित होत असलेलं पर्यावरण आज आपल्या समोरील सर्वात मोठं संकट आहे. पृथ्वीवरील जीवन हे एका चक्रानुसार चालतं. जोवर त्या चक्रातील सर्व कड्या जोडलेल्या आहेत तोवर सर्व ठीक राहील.

ह्यातील एक जरी कडी तुटली तरी संपूर्ण जनजीवन विस्कळित होईल. आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी आपण म्हणजेच मनुष्य प्राणी असणार आहोत.

ह्याचं कारण म्हणजे आधुनिकतेच्या आहारी गेलेलो आपण, ज्यांना निव्वळ ह्या जगात आधुनिकता घडवून आणायची आहे आणि त्यासाठी ते कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, जसे की आपले पर्यावरण.

पण एक-ना-एक दिवस पर्यावरणाच्या सहनशक्तीचा अंत होईल आणि तेव्हा हा निसर्ग रौद्र रूप धारण करेल ज्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. असं कित्येकदा पर्यावरण प्रेमी, भू शास्त्रज्ञ, जीववैज्ञानिकांनी वेळोवेळी सांगितले आहे.

 

 

सध्या सगळ्यांनाच ही बाब पटली आहे, आणि ते आपापल्या परीने पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रकारे प्रयत्न करून कुठेतरी पर्यावरणाचे रक्षण व्हावे ह्यासाठी आज आपल्याच नाही तर सर्वच देशातील सरकार तसेच अनेक स्वयंसेवी संथा कार्यरत आहेत.

वैश्विक स्तरावर ह्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आपल्या आजूबाजूला देखील अनेक असे लोक असतात ज्यांच्यापासून प्रेरणा घेत आपणही पर्यावरणाच्या सृजनशीलतेसाठी काही पावले उचलायला हवी असं वाटून जातं.

आज आपण आपल्या देशातल्या अश्याच काही पर्यावरण प्रेमींविषयी जाणून घेणार आहोत जे खऱ्या आयुष्यात हिरो ठरत आहेत.

 

१. प्रोफेसर राजगोपालन वासुदेवन – इंजीनियरिंग कॉलेजचे प्रोफेसर :

 

 

प्रोफेसर राजगोपालन वासुदेवन हे प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया या नावाने  देखील प्रसिद्ध आहेत. ते एका इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक असून त्यांनी आपल्या इनोवेशनच्या जोरावर कचरा आणि प्लास्टिकचा वापर करून चक्क रस्ते बनविले आहेत.

त्यांच्या ह्या आयडियाचे पेटेंट विकत घेण्यासाठी अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांना मोठमोठ्या ऑफर्स दिल्या. पण त्यांना पैश्यांचा मोह नव्हता. त्यांना तर भारतासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करायचे होते.

म्हणून त्यांनी भारत सरकारला ही टेक्नोलॉजी मोफत दिली. आता ह्या टेक्नोलॉजीने हजारो किलोमीटर पर्यंतचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या ह्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

 

२. एंजलिना अरोडा – युवा वैज्ञानिक :

 

 

एंजलिना अरोडाने १५व्या वर्षीच इको-फ्रेंडली प्लास्टिक बनविण्याची एक चांगली पद्धत शोधून काढली आहे.

मासे आणि कोळंबी ह्यांच्यापासून निघालेला कचरा तसेच खेकडा, कोलंबीची शेपटी, मास्यांची डोकी हे सर्व ती सिडनी येथील गर्ल्स हायस्कूलच्या सायन्स लॅबमध्ये घेऊन गेली, आणि त्यावर तिने रीसर्च करण्यास सुरवात केली.

तिच्या रिसर्चचा परिणाम म्हणजे एक मजबूत तसेच हलके आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार झाले.

 

३. सतीश कुमार – कचऱ्यातील प्लास्टिकचे इंधनात परिवर्तन :

 

 

सतीश कुमार ह्यांनी एक अशी टेक्नोलॉजी तयार केली आहे ज्याद्वारे आपण प्लास्टिकचे इंधनात परिवर्तन घडवू शकतो. इंधन बनविण्याच्या ह्या प्रक्रियेत पाण्याचा कुठेही वापर केला जात नाही. ह्या टेक्नोलॉजीमध्ये कचऱ्यातील प्लास्टिकला व्ह्यॅक्युमने इंधनात परिवर्तीत केले जाते.

 

४. अनुराग आणि सत्येंद्र मीना – ‘स्वच्छ मशीन’ :

 

 

आयआयटीचे दोन विद्यार्थी अनुराग आणि सत्येंद्र ह्यांनी एक असं मशीन तयार केलं आहे, ज्यात तुम्ही रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि अल्युमिनियमचे कॅन टाकू शकता.

ह्या मशीनचे नाव ‘स्वच्छ मशीन’ असे ठेवण्यात आले. प्रत्येक वेळी कचऱ्याच्या बदल्यात ह्या मशीनमधून ३०० मिली शुध्द पाणी येतं.

 

५. नारायण पीसापटी – एडीबल चमचा :

 

 

नारायण पीसापटी ह्यांनी एडीबल कटलरी तयार केली आहे. म्हणजेच प्लास्टिकच्या कटलरी ऐवजी आता तुम्ही एडीबल कटलरीचा वापर करू शकता.

अशी भांडी-चमचे जे वापरल्यावर खाता येऊ शकतात. ह्याचा विचार नारायण पीसापटी ह्यांना एका फ्लाईटच्या प्रवासादरम्यान आला. जेव्हा त्यांनी एका गुजराती सहयात्रेकरूला खाकरा ह्या पदार्थाचा चमच्यासारखा वापर करताना बघितले.

 

६. बाबा बलबीर सिंह सींचेवाल – बिन नदीचा उद्धार

 

 

बाबा बलबीर सिंह सींचेवाल हे पंजाब येथील एक पर्यावरण कार्यकर्ता आहेत. त्यांना ‘इको बाबा’ म्हणून देखील ओळखले जाते.

२००० साली बाबा बलबीर सिंह सींचेवाल ह्यांनी एकट्याने, कुणाचीही मदत न घेता १६० किलोमीटरच्या बिन नदीला स्वच्छ करण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर हळूहळू लोक तसेच सरकारनेही त्यांनी ह्या कामात मदत करण्यास सुरवात केली.

४० नगरांच्या कचऱ्याने नाला बनलेली ही नदी स्वच्छ झाली. जिथून जाताना लोकांना नाकावर रुमाल धरावा लागायचा आज त्याच नदीकाठी लोक पिकनिक साठी जातात.

हे आणि ह्यांसारखे अनेक पर्यावरण प्रेमी, निसर्गाचे आपल्यावर जे उपकार आहेत ते न विसरता पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत.

तुम्ही देखील ह्यांच्यापैकी एक होऊ शकता. गरज आहे ती केवळ आपल्या परीने प्रयत्न करायची.

जर भारतातील सर्व नागरिकांनी हा संकल्प केला की मी पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कुठलही कृत्य करणार नाही, तर निश्चितच आपले पर्यावरण सुरक्षित होईल आणि निसर्गाचे ह्या पृथ्वीचे ऋण आपल्याला काही अंशी नक्कीच फेडता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version