Site icon InMarathi

देशाचा अपमान करणाऱ्यांना भारतीय शास्त्रज्ञांनी ‘परम’ चमत्कार घडवून आपली ताकद दाखवली होती!

thebetterindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

एखाद्या देशाकडे स्वत:चा सुपर कम्प्यूटर असणे ही मुळातच अभिमानाची गोष्ट! तंत्रज्ञान विश्व काबीज करणाऱ्या पाश्चिमात्य जगाने जवळपास ५०-६० वर्षांपूर्वीच सुपर कम्प्यूटरचा शोध लावला होता.

सुपर कम्प्यूटरचा फायदा इतका प्रचंड की जगातील सर्वच देशांना स्वत:चा सुपरकम्प्यूटर हवा होता. त्यात आपला भारत देशही मागे नव्हता हे देखील खरे!

 

१९८५ साली याच आशेने भारताने अमेरिकेकडे सुपर कम्प्यूटरची मागणी केली. परंतु भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वत: वैयक्तिक विनंती करून देखील अमेरिकेचे राष्ट्रपती ‘रोनाल्ड रेगेन’ यांनी भारताला सुपर कम्प्यूटर देण्यास नकार दिला.

२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना हा नकार प्रगतीची कास धरणाऱ्या आपल्या देशाच्या अगदी जिव्हारी लागला.

खासकरून राजीव गांधींच्या, कारण जगभरात भारताची असलेली विकसनशील देशाची प्रतिमा बदलण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले होते.

indiatoday.com

परंतु तरीही १९८७ सालापर्यंत ते प्रयत्न करत राहिले आणि अमेरिका नकार देत राहिला. अमेरिकेला आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतासारख्या एका विकसनशील देशाला द्यायची इच्छा नव्हती.

यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने रशियाकडून सुपर कम्प्यूटर खरेदी करण्याचा सल्ला पंतप्रधानांना दिला.

तेव्हा भारत आणि रशियामध्ये सलोख्याचे संबंध होते. बोलणी झाली अन् रशिया सुपर कम्प्यूटर द्यायला तयारही झाला पण ऐनवेळेस अमेरिकेने आपला पाय मध्ये घातला.

अमेरिका रशियाला सर्वतोपरी मदत करायचा. सर्व देश रशियाच्या विरोधात असताना अमेरिका रशियाच्या बाजूने उभा राहिला होता.

रशियाला उमगले की आपण सुपर कम्प्यूटर भारताला द्यावा हे अमेरिकेला मान्य नाही. त्यामुळे नाईलाजाने रशियाने हा व्यवहार रद्द केला. पुन्हा एकदा भारताचे स्वप्न भंग पावले.

याचवेळी सुप्रसिद्ध कम्प्युटर बिझनेस फर्म IBM यांना भारतात आपला व्यवसाय स्थापन करायचा होता आणि त्यांचे लक्ष्य होते सुपर कम्प्यूटर तयार करण्याचे..!

Twenty19.com

भारत सरकारला त्यांची ही कल्पना आवडली, पण IBM ही अमेरिकन कंपनी असल्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकन सरकारने त्यात हस्तक्षेप केला. यावेळीस अमेरिकेचं म्हणणं होतं की भारताला सुपरकॉम्प्यूटर विकण्याला आमचा अजूनही विरोधच आहे कारण त्यामुळे आमच्या टेक्नोलॉजीकल सिक्युरिटीला धोका निर्माण होऊ शकतो.

अमेरिकेचा हा दावा साफ खोटा होता. कारण भारताने अगोदरच स्पष्ट केले होते की “आम्हाला केवळ हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी सुपरकॉम्प्यूटर हवा आहे त्याचा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापर केला जाणार नाही.”

सगळे प्रयत्न फसल्यानंतर राजीव गांधी पूर्णत: हताश झाले होते.

दरम्यान CSIR (Council of Scientific and Industrial Research) येथे १९८७ साली एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेमध्ये राजीव गांधी देखील उपस्थित होते. तेव्हा भारतीय शास्त्रज्ञांनी राजीव गांधींना पटवून दिले की आपण देखील स्वत:चा वेगळा सुपरकॉम्प्यूटर तयार करू शकतो.

राजीव गांधींनी भारतीय शास्त्रज्ञांना सुपर कम्प्यूटर बनवण्यासाठी मान्यता दिली खरी, परंतु अजूनही राजीव गांधींच्या मनात असा अविश्वास होता की अमेरिकेसारखा सुपर कम्प्यूटर भारतीय शास्त्रज्ञ बनवू शकत नाहीत.

परवानगी मिळवल्यावर हा प्रकल्प पुणे शहरातील CDAC (Center for Development and Advanced Computing) संस्थेकडे सुपूर्त करण्यात आला. भारतासाठी सुपर कम्प्यूटर बनवण्याच्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पामध्ये योगदान देण्यासाठी देशभरातून विविध शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

स्रोत

संपूर्ण प्रकल्पासाठी भारत सरकारने ३० मिलियन डॉलर्सची तरतूद करून दिली होती. ही रक्कम जरी मोठी वाटत असली तरी सुपर कम्प्यूटर बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या दृष्टीने ही अगदीच नगण्य रक्कम होती.

…आणि अथक मेहनत घेऊन ठरवलेल्या वेळेत अखेर शास्त्रज्ञांनी प्रकल्प पूर्ण केला…! त्यांच्या हातांनी इतिहास घडवला होता…!

भारतासारख्या एका विकसनशील देशाने जगासमोर आपला पहिला वाहिला सुपर कम्प्यूटर निर्माण करून दाखवला.

सर्व विकसित देशांनी ही कामगिरी पाहून तोंडात बोटे घातली. अमेरिका तर सरळ सरळ तोंडघशी पडली होती. या पहिल्यावहिल्या सुपरकॉम्प्यूटरचे नाव ठेवण्यात आले “परम 8000”

आणि या ऐतिहासिक प्रकल्पाचे नेतृत्व हाती घेतले होते डॉ. विजय भटकर यांनी..!

 स्रोत

भारत इतर देशांसमोर सुपर कम्प्यूटरसाठी भिक मागतोय या गोष्टीची डॉ. विजय भाटकर यांना प्रचंड चीड होती. त्यांचा भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी हा विचार मांडला की भारत देखील सुपर कम्प्यूटर बनवू शकतो.

याच डॉ. भटकरांनी १९९८ साली ‘परम-10000’ हा भारताचा दुसरा सुपर कम्प्यूटर निर्माण करण्याचे मिशन हाती घेतले आणि ते देखील पूर्णत्वास नेऊन दाखवले.

स्रोत

परम सुपर कम्प्यूटर सिरीजची काही वैशिष्ट्ये:

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version