Site icon InMarathi

सोन्याची लंका म्हणून ओळखला गेलेला देश आज या कारणांमुळे कर्जबाजारी झालाय

sri crisis im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या जगात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झालेला दिसून येत असला तरी चीनमध्ये तो पुन्हा डोकेवर काढतो आहे, दोन  वर्षांपूर्वी  कोरोनाची साथ आली आणि पूर्ण जगच ठप्प झाले, हळूहळू सर्व जग रुळावर येऊ लागले मात्र काही देशांचे अक्षरशः कंबरेडे मोडले आहे यातीलच एक देश म्हणजे आपला सख्खा शेजारी श्रीलंका

रावणाची लंका ‘सोन्याची’ होती असं सांगितलं जातं.प्रचंड वैभव,अफाट संपत्ती हे लंकेचं वैशिष्ट्य होतं. एकेकाळी ‘सोन्याची लंका’ म्हणून ओळखली जाणारी ही नगरी आता ‘कर्जबाजारी लंका’ म्हणून ओळखली जातेय. तुमचा विश्वास बसत नसेल तर वाचा..

श्रीलंका सध्या गंभीर परकीय चलनाच्या संकटात सापडला आहे आणि सरकार आवश्यक आयातीचे बिल भरण्यास असमर्थ आहे. भारताच्या खालोखाल असलेले हे सुंदर बेट आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

 

 

अन्नधान्याच्या वाढत्या किमती, घसरणारे चलन आणि झपाट्याने कमी होत असलेला परकीय चलन साठा यामुळे श्रीलंका सरकारने २०२१ मध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर केली. आता तर अशी परिस्थिती आली की राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी लष्कराला पाचारण केले.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, श्रीलंकेतील ५ लाख लोक साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत, ज्याचे वर्णन “पाच वर्षांच्या प्रगतीचा समतुल्य मोठा धक्का” असे मानले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाला कारणीभूत असणारी काही प्रमुख कारणे आपण पाहुयात..

पर्यटनाला फटका

आशिया खंडातील अनेक देश पर्यटनावर अवलंबून आहेत, या देशाच्या जीडीपीमध्ये १० टक्के वाटा असलेल्या पर्यटन उद्योगाला साथीच्या रोगाचा मोठा फटका बसला आहे. परकीय चलनाच्या संकटामुळे कॅनडासह अनेक देशांनी अलीकडेच आपल्या नागरिकांना बेटावरील देशात प्रवास करण्याबद्दल चेतावणी दिली आणि यामुळे उद्योगाला मदत होणार नाही. यूके, भारत आणि रशिया हे बेट देशासाठी अंतर्गत पर्यटनाचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत. या साथीच्या रोगामुळे पर्यटन उद्योगाला जवळ जवळ स्थगितीच मिळाली.

 

 

फूड माफियांचा सुळसुळाट

शेती १०० टक्के सेंद्रिय करण्यासाठी रासायनिक खतांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन निम्म्याने कमी होत असल्याने नवीन कायद्याचा फटका कृषी उत्पादनाला बसत आहे. ‘फूड माफियां’कडून जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीमुळे तांदूळ आणि साखरेसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.

 

 

मोठ्या प्रमाणावर असलेलं परदेशी कर्ज

देशाला भेडसावत असलेली एक मोठी समस्या म्हणजे परदेशी कर्ज !.श्रीलंकेवर एकट्या चीनचे ५अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे.आजही ते बीजिंगकडून २०२१ मध्ये घेतलेल्या अतिरिक्त १ अब्ज डॉलर कर्जाची भरपाई करत आहे. भारत आणि जपानचेही यांच्यावर मोठे कर्ज आहे. नोव्हेंबरपर्यंत, देशाजवळ उपलब्ध परकीय चलन साठा फक्त१.५८ अब्ज डॉलर इतकाच होता, त्यानंतर २०१९ मध्ये राजपक्षे अध्यक्ष झाले आणि मग ७.५ अब्ज डॉलर झाला.

 

२०१९ मधील परकीय चलन साठा ७.५अब्ज डॉलरवरून जुलै २०२१ मध्ये सुमारे २.८ अब्ज डॉलर इतका घसरला. श्रीलंकनांना वस्तू आयात करण्यासाठी आवश्यक असलेले परकीय चलनच खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणारा पैसा वाढत असताना परकीय चलनाच्या पुरवठ्याला फटका बसला. परिणामी, श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य घसरले.

जीवनावश्यक वस्तूंची महागाई

श्रीलंकेची साखर, डाळ, तृणधान्ये आणि औषधी यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या आयातीवर जास्त अवलंबित्व असल्याने देशाला आयातीची बिले भरण्यासाठी परकीय चलनाची कमतरता भासत असल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे.

 

 

राष्ट्रपतींबाबत नाराजीचा सूर

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी २२ दशलक्ष लोकसंख्येच्या बेट राष्ट्रात गंभीर आर्थिक संकटात निष्काळजी पणे हाताळल्या बद्दलचा संताप गुरुवारी(३१मार्च) उशिरा हिंसाचाराच्या रुपात दिसून आला. शेकडो आंदोलकांची पोलिसांशी अनेक तास झटापट झाली. परकीय चलनाच्या तीव्र तुटवड्यामुळे राजपक्षे सरकारला इंधनासह अत्यावश्यक आयातींसाठी पैसे देण्यास असमर्थ ठरले आहे.

 

 

ज्यामुळे १३ तासांपर्यंत वीज खंडित होत आहे. कर्ज कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत बोलण्याआधी गेल्या महिन्यात देशाने आपल्या चलनाचे प्रचंड अवमूल्यन केल्यानंतर सामान्य श्रीलंकेचे लोकही टंचाई आणि वाढत्या महागाईचा सामना करत आहेत.

आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की भारताचे शेजारी देश वेगवेगळ्या अडचणीत सापडले आहेत.पाकिस्तानमध्ये आता राजकीय अस्थिरता आहे तर रशिया-युक्रेनमध्ये मोठा तणाव आहे आणि आता श्रीलंका सुदधा या आर्थिक गर्तेत सापडला आहे.याचाच अर्थ इतर देशात जी राजकीय स्थिरता नाही ती सध्या भारतात आहे.एवढं असूनही जर कोणी आपल्या देशाला नावं ठेवत असाल तर एकदा बाहेरच्या देशांची परिस्थिती बघा आणि ठरवा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version