Site icon InMarathi

अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेणारी ८ सेलिब्रेटी कपल्स!

dhanush 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूडमध्ये सतत कोणाचा ना कोणाचा घटस्फोट होतच असतो. जेवढ्या लवकर या कलाकारांचे लग्न जुडतात, तेवढ्याच लवकर यामधील अनेकांचे लग्न तुटून जातात. अनेकांना तर लग्नाच्यावेळी जेवढा खर्च आला नसेल त्याहून दुप्पट ते तिप्पट खर्च घटस्फोटावेळी आला असतो. चला तर जाणून घेऊया त्या बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल ज्यांचे घटस्फोट सतत चर्चेचा विषय ठरले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

● धनुष आणि ऐश्वर्या :-

‘Why This Kolaveri Di’ या गाण्यातून आणि मारीभाई या भूमिकेतून सर्वांच्या मनावर राज्य केलेला रजनीकांत यांचा जावई धनुष आणि मुलगी ऐश्वर्यामध्ये लग्नानंतर १८ वर्षांनी या आठवड्यात घटस्फोट झाला आहे.

धनुषने ऐश्वर्याशी लग्न केले तेव्हा तो २१ वर्षांचा होता आणि ऐश्वर्या तेव्हा २३ वर्षांची होती. वयाच्या २३ वर्षांच्या आधी लग्न व्हावे अशी धनुषची नेहमीच इच्छा होती. दोघेही २ मुलांचे पालक आहेत. लग्नानंतर ते सुखी जीवन जगत होते पण आता ते कायम एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

 

 

● करिश्मा कपूर आणि संजय कपूर :-

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या १३ वर्षांनंतर म्हणजेच २०१६ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिले होते. या दोघांचे २००३ मध्ये प्रेमविवाह झाले होते. प्रेमविवाह असूनही लग्नाच्या काही वर्षानंतर या दोघांमध्ये सतत भांडणे व्हायला सुरुवात झाली, एकदा सैफ अली खानने या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु याने काहीही साध्य झाले नाही.

 

 

संजयने घटस्फोटानंतर प्रिया चटवाल हिच्याशी लग्न केले, तर करिश्मा ही संदीप तोष्णीवाल याला डेट करत असल्याची बातम्या सतत सुरु असतात. घटस्फोटादरम्यान करिश्मा आणि संजय यांच्यात १४ कोटी रुपयांचा करार झाला होता. ज्या अंतर्गत बिझनेसमन संजय करिश्माला दर महिन्याला १० लाख रुपये देत आहेत. करिश्मा हा पैसा त्यांच्या दोन मुलांच्या संगोपनासाठी खर्च करत असते.

● अरबाज खान आणि मलायका अरोरा :-

मलायका आणि अरबाज यांनी त्यांच्या लग्नाची १८ वर्षे एकत्र घालावली, तसेच त्यांचे वैवाहिक जीवन देखील खुप आनंदी होते. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे २०१६ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांच्या मुलाचा ताबा सध्या मलायकाकडे असून, अरबाज त्याला कधीही भेटू शकतो.

एका रिपोर्टच्या मते मलायकाने अरबाजकडे पोटगी म्हणून १५ कोटी रुपयांची मागणी केली होती. सध्या मलायका ही अर्जुन कपूर याला डेट करत असल्याची बातमी अधुन-मधून सोशल मीडिया वर फिरत असते.

 

 

● हृतिक रोशन आणि सुझान खान :-

या दोघांची प्रेमकहाणी कॉलेजमध्ये बहरली होती आणि लोक यांच्या जोडीला ‘परफेक्टली इन लव्ह’ म्हणत असत. या दोघांनी २००० साली लग्न केले होते, परंतु नंतर विवाहबाह्य संबंधाच्या बातमीमुळे दोघांचा घटस्फोट झाला होता. या बातमीने केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर हृतिकच्या चाहत्यांनाही खुप मोठा धक्का बसला होता.

 

 

यांच्या घटस्फोटाची विशेष बाब म्हणजे हा घटस्फोट फक्त देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये एक गणला जातो. सुझान खानने हृतिककडे पोटगी म्हणून ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी ३८० कोटी रुपये तिला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

● सैफ अली खान आणि अमृता सिंग :-

जितकी चर्चा यांच्या लग्नाची झाली होती, त्यापेक्षा जास्त चर्चा तर यांच्या घटस्फोटाची झाली आहे. १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृताशी लग्न केल्यानंतर, लग्नाच्या ठीक १३ वर्षांनंतर सैफने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की, घटस्फोटादरम्यान ५ कोटी रुपये पोटगी निश्चित करण्यात आली होती, त्यापैकी २.५ कोटी रुपये त्याने दिले आहेत.

 

Desi martini

यासोबतच प्रत्येक महिन्याला अमृताला मुलांची काळजी घेण्यासाठी एक लाख रुपये सैफ अली खान देत आहे. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. तसेच यानंतर सैफ ने करीना कपूर सोबत लग्न केले आहे.

● आमिर खान आणि रीना दत्ता,किरण राव  :-

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले. पण काही वर्षांतच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि १६ वर्षानंतर २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. हा घटस्फोट आमिरला खूप जड गेला. माध्यमांनुसार आमिरने रीनाला ५० कोटी रुपये पोटगी रक्कम म्हणून दिले होते. नंतर त्याने किरण राव सोबत लग्न केले मात्र त्यांच्यात देखील घटस्फोट झाला आहे.

 

 

● फरहान अख्तर आणि अधुना भबानी :-

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने तब्बल १५ वर्षांनंतर पत्नी अधुनाला घटस्फोट दिले. या जोडप्याला शाक्य आणि अकिरा या नावाची दोन सुंदर मुले आहेत. सध्या श्रद्धा कपूर आणि फरहान यांचे अफेअर असल्याची अफवा खुप जोरात पसरलेली आहे. मात्र, श्रद्धा आणि तिच्या कुटुंबीयांनी अशा सर्व बातम्यांना नाकारले आहे.

घटस्फोटानंतर अधुनाने मुंबईतील १००० स्क्वेअर फुटांचा फरहानचा बंगला तिच्याकडे ठेवण्याची मागणी केली आहे. याशिवाय फरहान आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी अधुनाला दरमहा मोठी रक्कम देत असतो.

 

 

● अर्जुन रामपाल आणि मेहर जेस्सीया :-

भारतीय फॅशन शो मधील सर्वात प्रसिद्ध जोडपे अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी लग्नाच्या २०वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये एकमेकाला लग्नाच्या बंधनातून मुक्त केले. या जोडप्याला दोन सुंदर मुली आहेत. त्यांच्या घटस्फोटाची बातमी अनेक दिवसांपासून इंटरनेटवर यायची परंतु प्रत्येक वेळी हे दोघेही ती बातम्या नाकारायचे. परंतु काही दिवसांनी या दोघांनी खरोखरच एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

 

 

अर्जुन सध्या मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लाइव इन रिलेशनशिप मध्ये असून आणि या जोडप्याने जुलै २०१९ मध्ये त्यांच्या मुलाच्या पहिले जन्मदिवस साजरे केले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version