Site icon InMarathi

“लांब फेकण्याच्या स्पर्धेत ‘सर्वोत्तम खेळाडू’ न पाठवल्याने आपण सुवर्णपदक गमावलं” भाई जगताप होताहेत ट्रोल

bhai final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे पूर्ण जग ढवळून निघाले आहे. प्रत्येक देशाने आपापल्या परीने या महामारीचा सामना केला, अगदी प्रगत देशाने सुद्धा या महामारीपुढे हात टेकले, गरीब देशांचे तर कंबरडे मोडले गेले

आपल्याकडे मागच्या वर्षीपासून सुरु झालेला लॉकडाऊन, आजही काही प्रमाणात चालूच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, गगनाला भिडलेले पेट्रोलचे दर, वाढलेली महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न आज सर्व सामन्यांनापुढे आवासून उभे आहेत.

 

 

आज देशातील जनता आशेने आपल्या सरकारकडे बघत आहे मात्र मोदी सरकार कोणतीच ठोस पाऊले उचलताना दिसत नाही. मोदी फक्त निवडुणकांमध्ये रमले आहेत अशी टीका विरोधी पक्ष करत आहे. राहुल गांधींनी बंगाल निवडुणकांमध्ये सहभाग घेतला नव्हता म्ह्णून काहीजण त्यांचे कौतुक करत होते.

२०१४ पासून सत्तेत आलेल्या मोदी सरकारवर विरोधी पक्ष प्रत्येक बाबतीत टीका करत आहेत, मोदी सरकारच्या अनेक योजनांवर विरोधी पक्षाने कायमच टीका करत आले आहेत. आज मोदींवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत टीका होत आहे.

काँग्रेसचे माजी आमदार भाई जगताप हे तर कायमच मोदींवर टीका करण्यात पुढे असतात. नुकतंच ऑलिम्पिक स्पर्धा सुरु झाली आहे त्यावरून देखील त्यांनी एक टीकात्मक पोस्ट टाकली आहे, ज्यात ते उपहासात्मकरित्या मोदींवर टीका करत आहेत, नक्की काय आहे ती पोस्ट जाणून घेऊयात आणि त्यावरच्या मजेशीर कॉमेन्स्ट्स वाचूयात

 

 

नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात त्यातलाच एक झकास फोटो घेऊन भाईंनी ही पोस्ट टाकली आहे. मोरासोबतच्या एका फोटोवरून सुद्धा त्यांना ट्रोल केले गेले होते.

 

 

मोदींवर सामान्य माणूस टीका करतोच, मात्र भाईंनी टाकल्या या पोस्टवरून आता थेट भाईंवर लोक टीका करत आहेत. मोदींनीच काँग्रेसला सत्तेपासून लांब फेकले आहे असे लोकांचं म्हणणं आहे.

 

 

काँग्रेसमधले कायमच वरिष्ठांची मर्जी सांभाळत आले आहेत आणि त्यांच्या तालावर नाचत आहेत, अस काहींचं म्हणणं आहे.

 

 

मध्यंतरी भाई जगतापांचा एक विडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते बैलगाडीतून मोर्चा नेत होते आणि जास्त लोकांमुळे ते बैलगाडीतून पडले. यावरून त्यांची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

 

हे ही वाचा – केआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘!! वाचा

मोदींवर टीका केल्यावर मोदी समर्थक नक्कीच पुढे येणार, पंतप्रधांवर टीका करताना ती सांभाळून करावी असे यांचे म्हणणं असेल.

 

 

काँग्रेसची विचारसरणी खालच्या स्तरातली आहे, मानसिक गरिबी हेच काँग्रेसच्या ऱ्हासाचे मूळ कारण आहे असे एकाच म्हणणं आहे.

 

 

पी.व्ही. सिंधूने नुकतेच कांस्यपदक जिंकले आणि आपल्या पदरात आणखीन एका पदकाची भर पडली. तिचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट फार कमी राजकारण्यांनी टाकल्या आहेत.

मुळात देशासाठी खेळणाऱ्या या खेळाडूंची अशी थट्टा करणं आणि सरकार वर टीका करणं याच गोष्टीवरून भाईंना आज लोक टार्गेट करत आहे. विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारलाच हवाच, सध्या पेगासस वरून विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसून येतोच आहे. मात्र विरोधी पक्षाने सुद्धा टीका करताना तारतम्य बाळगायला हवे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version